Tuesday, 4 July 2023

-- -:♦ द्वारका नगरी पाण्यात का बुडाली ? ♦:- --

-- -:♦ द्वारका नगरी पाण्यात का बुडाली ? ♦:- --

|| श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर 
|| जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली 

|| द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्री कृष्णा समवेत संपूर्ण 
|| यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथांनुसार 
|| “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची 
|| नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख 
|| कारणे सांगितली जातात.

|| एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि 
|| दुसरी म्हणजे ऋषी मुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला 
|| दिलेला शाप.

|| अर्थात, सदर पौराणिक कथा या काही द्वारकेला 
|| जलसमाधी मिळाल्याचे सबळ पुरावे मानता येत नाहीत. 
|| पण आजही त्या समुद्रात एक शहर आहे, जे अगदीच 
|| महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवते. संशोधक आजही 
|| पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य 
|| उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.

|| असो – तर आपण या कथा सविस्तरपणे जाणून घेऊया.

|| गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप

|| महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठीर पुन्हा एकदा 
|| सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने 
|| महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून 
|| शाप दिला की,

|| ज्याप्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे 
|| यदुवंशाचा सुद्धा नाश होईल.

|| ऋषींनी दिला होता सांबाला शाप

|| महाभारत युद्धानंतर जेव्हा ३६ वे वर्ष सुरु झाले तेव्हा 
|| अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत 
|| अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी 
|| विश्वमित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदु 
|| वंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले.

|| त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात 
|| ऋषींसमोर उभे गेले आणि ऋषींना सांगितले की,

|| ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल ?

|| सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला 
|| अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधीत होऊन शाप 
|| दिला की,

|| श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या 
|| पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ 
|| निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि 
|| क्रोधी लोक स्वत:च स्वत:च्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल. 
|| त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम 
|| वाचतील.

|| श्रीकृष्णला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री 
|| होती की हा शाप खरा ठरणार.

|| ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी 
|| मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला 
|| समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो 
|| समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर 
|| अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली.

|| नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर 
|| माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री 
|| झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात 
|| असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका 
|| आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले.

|| श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले, 
|| तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा 
|| होण्याची वेळ समीप आली आहे.

|| हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्षाच्या तेराव्या 
|| दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या 
|| युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता.

|| गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर 
|| श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर 
|| जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मन राखून 
|| सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन 
|| राहू लागले.

|| प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि 
|| वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली.

|| तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला. 
|| हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याचावर 
|| हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र 
|| प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला.

|| सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले, 
|| परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक 
|| वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला.

|| आपला पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधीत होऊन 
|| श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच 
|| क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये 
|| परावर्तीत झाले.

|| त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते 
|| समोरचाचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास 
|| तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास 
|| सुरुवात केली.

|| श्रीकृष्णाच्या डोळ्यादेखत सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध 
|| आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने 
|| रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला. 
|| तेव्हा त्यांनी आपला सारथी दारूक याला सांगितले की,

|| तू हस्तिनापूराला जा आणि अर्जुनाला या सर्व 
|| प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये.

|| दारूकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण 
|| पुन्हा द्वारकेला परतले त्यांनी सर्व गोष्ट पिता वासुदेवांना 
|| सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दु:ख वासुदेवलाही झाले.

|| ही वार्ता वडिलांना ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला 
|| भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले कि 
|| बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या 
|| श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या 
|| उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते 
|| जमिनीवर पडून राहिले.

|| ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते, त्याचवेळी जरा 
|| नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने 
|| लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला.

|| बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे 
|| गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप 
|| झाला.

|| तेव्हा –

|| “हे सर्व विधिलिखित असून, माझा अवतार असाच 
|| संपणार होता…”

|| हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते 
|| स्वर्गात निघून गेले.

|| इकडे दारूक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात 
|| दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन 
|| त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला 
|| आला, तेव्हा तेथील भयावह परीस्थिती बघून त्याला खूप 
|| दु:ख झाले.

|| वासुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन 
|| जाण्याची विनंती अर्जुनाला केली. कारण श्रीकृष्णाचे 
|| अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा 
|| देखील अंत होणार होता.

|| अर्जुनाने वासुदेवाची ही विनंती मान्य केली आणि 
|| आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना 
|| होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासीयांनी 
|| अर्जुनाची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रस्थानाची तयारी सुरु 
|| केली.

|| दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवानी आपल्या प्राणाचा 
|| त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार 
|| केले. वासुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सुद्धा 
|| वासुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने 
|| प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा 
|| अंतिम संस्कार केले.

|| सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि 
|| नगरवासीयांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेला.

|| सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय 
|| द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून 
|| सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच 
|| द्वारकेला जलसमाधी मिळाली. 

|| बुधवार :--- { ०५ / ०७ / २०२३ } !............

Monday, 3 July 2023

देविदास गिरे - अकोला

🔴 माझे गुरु ! माझी बायको !! 🔴

आज गुरुपोर्णीमा - आजचा मंगल पवित्र दिवसं.... गुरु म्हणजे नक्की काय ?  माझ्या मते.. जी व्यक्ती आपल्या जीवनाला कलाटणी देते, ज्यामुळे आपल भलं होते, ज्या व्यक्ती मुळे विचार आचर सुधारतो... ती व्यक्ती म्हणजेच गुरु... हे माझ मत आहे... कुणाला पटेलचं अस काही नाही...

आयुष्याचे प्रवासात कळतं नकळतं अनेक लोकांशी आपला संपर्क येतो, ते आपले गुरुच मानलं तर त्यात वावगे काहीच नाही.... अस मला वाटतं... संतानी पण हे मान्य केलेलं असून कुण्या तरी संताने वेश्येला पण आपले गुरु मानलेले आहे.... 

निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताई... या भावडांना छळणारा विठोबा खेचर, यांने तर चक्क सोपानदेव यांनाच गुरु केले अन ते, अंतर:बाह्य बदलून, विठोबाशास्त्री झाले.... वाल्या दरडोखोराने नारदाला गुरु मानले अन वाल्याचा वाल्मीका झाला...

गुरु दर्शनाने म्हणा की देव दर्शनाने म्हणा एक उर्जा प्राप्त होते.... गुरुंची शक्ती विचार बदलतात...  विचार बदलला की आचारण... नंतर मनुष्य अंदरुन बाहेरुन बदलून जातो... अन त्याची श्रध्दा अधिक दृढ होते.... 

तसचं देवाचे प्रतीपण... आपण वारी करतो, पुजा करतो, प्रार्थना करतो, पारायण करतो, प्रवचनाला जातो, किर्तनाला जातो....  यात जर सातत्य ठेवलं तर विचार बदलतात... नंतर आपोआप आचार वर्तन वागनं  बदलून  जाते.... बदलाची जाणीव आपणाला झाली की, श्रध्दा अधिक दृढ होते... 

माझ ही तसचं आहे... आईवडीलांनी घडवलं... भावाने मार्गदर्शन केलं... माझे हे तिन्ही गुरु या जगात नाहीत... मला तारलं एका व्यक्तीनेच... ती व्यक्ती माझ्या जीवनात आली.... अन उलथापालत झाली... मी आज जो उभा आहे... त्या व्यक्ती मुळेच... ती व्यक्ती म्हणजे माझी बायको... माझे गुरु ! माझी बायको !!... हो हो माझी बायकोच... अजून तरी कुणाला गुरु करण्याच काम पडलं नाही, अन त्या फंदात ही मी पडलो नाही, पडणारपण नाही....मी सामान्य व्यक्ती... कोण मला शिष्य करणार, हा ही एक प्रश्न आहेच.... असो

आयुष्याचा प्रवास करता करता.... उंच उंच शिखरावर पोहचलो.... रिटायर्ड झालो... शिखरावरु खाली नजर जाता, डोळे फाकत होते... अर्थात मागे वळून बघत असता, माझ मलाच नवलं वाटतं होत, नवलं वाटतं आहे... होतो कुठं, आहे कुठं.... ते माझ्या या तीन गुरुचीचं कृपा....

रिटायर्डमेन्टचे अगोदर जो होतो, तो आज नाही... आज तो बाप नाही, आज तो पती नाही, आज तो सासरा नाही, आज तो भाऊ नाही, आज तो मी मी नाही, मी मी करणारा चिडचिडा रागीट आदडआपट करणा नाही..... आज आहे, शांत शांत.... विचारशुन्य असलेला देविदास आहे मी...
गुरु म्हणजे... मंत्र देतो, हातात धागा बांधतो, गळ्यात माळ टाकतो, डोक्यावर हात ठेवतो तो गुरु... पुर्वी होत तस, गुरुला ही शिष्याची काळजी असायची... यातूनच किती तरी संतमहात्मे घडले... अन त्याचमुळे आपली संस्कृती टिकून आहे... गुरु शिष्य परमंपरा महान आहे.... पुर्वी होती तसीच आता ही आहे... पण त्याला धंद्याच रुप आलं.... 

याला अनेक कारणे आहेत... पर्वी शिष्य उतराई म्हणून फुलनाफुलाची पाकळी गुरुदक्षाना म्हणून देत होते... पण आता तसं नाही... मागितल्या शिवाय शिष्य ही देत नाहीत... त्यामुळेच धंद्याच रुप आल, अस आपणाला दिसतं.... पण दिसते तस नाही... मिळालेल्या पैश्यातून ते सामाजीक विधायक लोकउपयोगी कार्य करतात.... विकासाला हातभार लावतात... पण शिष्य काय करतात.... हा एक संशोधनाचा विषय आहे...

गुरु हे गुरुच असतात... पण शिष्य हे शिष्य असतातच अस काही नाही... गुरु करायचा म्हणून गुरु करतात... छान प्रवचन असते, काळजाला हात घालतात... मगं काय शेकडो लोक गुरु करण्यासाठी धडपडतात.... शेकडोने लोक असतात.... महाराज लोकांचीही मजबुरी असते... एका लाईनीत बसवतात... अन महाराज एकएकाचे डोक्यावर हात ठेवतं, चालतात अन निघून जातात... झाला गुरु.... झाला शिष्य.... शिष्य बाहेर येतो... खिशात हात घालतो... एक पुडी काढतो... दाताने तोंडतो.... तशीच तोंडात खाली करतो.... खातो ते जहर असते.... त्या पुडीवर वॉर्निंग असते... असा हा शिष्य...

डोक्यावर हात ठेवून झालेले शिष्य, जे आठदहा शिष्य... सक्रीय असतात ते... प्रवचनाचे दिवसी जस वातावरण असते, ते टिकविण्याचा आटापिटा करतात...  दरवर्षी गुरुपोर्णीमेला किंवा प्रसंगारुप काहीना काही उत्सव साजरे करतात... त्यासाठीच्या रक्कमेची तरतूद...  वर्गणी जमा करताता... आपली कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढतात, वर्गणी जमा करतात... या सक्रीय शिष्यांना माझा नमस्कार, मानाचा मुजरा... 

नमस्कार, मानाचा मुजरा..... पण त्यांनी आग्रह केला की... महाराजांन प्रती असलेली उरली सुरली श्रध्दा संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.... अन ते करतात आग्रह... मोठी रक्कम टाकून, सरळ पावतीच हातात देतात.... कारण ते गुरुभाऊ असतातना.. 

ही मोठी रक्कमच त्याला भानावर आणतं... कारण भावनेच्या आहारी जावून गुरु केलेला असेल तर... अन असत ही तसचं, अस मला वाटतं... भारावण्या लायक म्हणा की संमोहिताला पोषक अस  प्रवचनाचं वातावरण असतं, त्यातुनच एकाच वेळी शेकडो व्यक्ती, गुरु करण्याला तयार होतात... अस माझ निरिक्षण आहे...

असल्या शिष्यांची भावना टिकविण्याच काम, या सक्रीय शिष्यांवर असते... गुरुबंधूच नात टिकवणं याचेच हाती असते... नाही तर आपण बघतोच, जिथं अपेक्षा वाढली, तिथं भावा भावात दुरावा झालेला दिसतो... मगं गुरु गिरु गेले उडतं... असली कुजबूज मी ऐकलेली आहे....

माझ्या पाहण्यात.... अनुभवलेला एकच धार्मिक परिवार आहे... तो म्हणजे पांडूरंगजी शास्त्री, दादाजी आठवले यांचा स्वाध्याय परिवार... या परिवाराची शिस्त वाखाण्या जोगी आहे... चप्पला बुट एका रांगेत व्यवस्थीत ठेवतात... ना गडबड - ना गोंधळ... ना कुठ जाहिरात... हे स्वाध्यायी भाऊ.... खरच एकमेकांचे गुरुबंधूच... कुणा कडून ही काही काही अपेक्षा नसते... स्वत:च ते सक्रीय कार्यकरते असतात... त्यांची भावफेरी असते... ते घरोघरी जातात... जोडप्याने जातात, भेटतात.... आत्मयतीने चौकशी करतात... दोन शब्द योगेश्वरा बद्दल सांगतात.... कुठ ही, कुणाचे ही घरी पाणी ही पित नाहीत... गांवो गांवी जातात.... त्याचा मुक्काम असतो.... मुक्काम असलेल्या घरी ते फक्त पाणी घेतात... स्वयंपाकाचा शिधा आटा, स्टोव्ह किंवा छोटस सिंलेडर सोबतच नेतात... कुठ जाण्यच काम पडलं तर.... स्व:खर्चाने जातात... स्व:खर्च करतात... आर्थीक भुरद्ड सोसतात... खरच सांगताना मला आनंद होत आहे... याचे पुढे आदराने माझी मान झुकते... त्याच्यात मला योगेश्वराचं कृष्णाचं दर्शन होते, ऐवढ निश्चित..... किती ही लखपती करोडपती असो, तो पण साधा स्वाध्यायीच... 
शिक्षक प्राध्यापक लेक्चरर प्रोफेशर... हे गुरु स्थानीच, या गुरु लोकांना खुप खुप शुभेच्छा... माझा मानाचा मुजरा....

पण मला गुरुजींचा फारच कटू अनुभव आलेला आहे.... सर्वच गुरुजी असे नसतात... पण मला आलेल्या अनुभावरुन सांगत आहे... आजचे गुरुजी गरिबांचे तर अजीबात नाहीत... हुशार होतकरु गरिबां लेकरांचे पाठीवर थाप यांची कधीच पडत नाही... पैसेवाला जमीनदाराच्या बाबूचे पाठीवर थाप मारण्यासाठी लाचार असतात... असले बाबू असेना कसा ही त्याला डोक्यावर घेतात.... मॅट्रीक मध्ये आपटतात, काही दिवस गुरुजी खाली मान घालून चालतात हा भाग वेगळा... पॉलीटेक्नीक मध्ये जावू नये... म्हणून माझ्या वडिलांचे दोन गुरुजींनी कान भरले होते... उदाहरण देत ते याच त्याचं... टिकणार नाही... वडिलांना ही पटलं... मी दोन दिवस उपाशी... एक दिवस शेतात जावून बसलो... माझ्या भावाने समजवलं म्हणून जमलं... खर तर आईवडिलांन नंतर, माझा पहिला गुरु माझा मोठा भाऊ... रामदासभाऊ... माझ्या जीवनाला कलाटनीच मिळाली...  टेन्शन फ्री आयुष्य व्यतीत करीत आहे....

मनुष्याचे स्मरणात दोनच व्यक्ती असतात... एक जीवनला कलाटणी देणारा... अन दुसरा पैसे बुडवणारा... एकाला मनोमन पुजतो दुसर्याला शिव्या घालतो... हाच काय तो स्मरणात फरक.... म्हणूनच त्या दोन मास्तरांची ही आठवण झाली....

आजचा पवित्र दिवस... गुरुशिष्याची परमंपरा जपणारा दिवस... गुरु लोकांचा अनादर करण्याचा माझा इरादा नाहीच... सर्वच गुरु असे नाहीत... कुणाच मन दु:खल असेल तर क्षमा मागतो... पण कटू सत्य हेच आहे की, आजचे गुरुजी पैसे कसे कमवायचं यांच ज्ञान देनारा हा मास्तर आहे, प्राध्यापक आहे, लेकचरर आहे, प्रोफेसर आहे....

देविदास गिरे - अकोला
गुरुपोर्णीमा-दि. ३ जून २०२३

Monday, 26 June 2023

कालभैरव माहिती

🌿🌿 कालभैरव माहिती 🌿🌿

श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे . ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत . आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे .  जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु . त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय . हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे . ज्याची काया सर्वात मोठी आहे . जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे . असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात .
         कालभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष , नजरदोष ,ग्रहबाधा ,शत्रूबाधा ,भुत प्रेत पिशाच्चबाधा ,करणी ,भानामती , तसेच ईंद्र, कलि ,माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते .मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत .  तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल . त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य,पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते .पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते . हे दैवत विधिलिखितही अडवतं . श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे .  हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता . तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही . अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे .मृत्युपेक्षाही भयानक आहेत .  उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत .ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात . गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत .  त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो . मनात भय रहात नाही . आंतरिक विचारात बळ येते . जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो . शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते . अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते . कठिण कार्य सहज पूर्ण होतात . आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो . सदगुरु हे कामधेनु आहेत . श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते . पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही . 
         श्री कालभैरव यांनी  मृत्यु , देवराज ईंद्र , ब्रम्हदेव , नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते . लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही . श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात .श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही .  हा मार्ग अत्यंत कठीण . जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे . शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे . श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही . 
         श्री कालभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे . म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे . श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात . क्षेत्र म्हणजे शरीर . पाल म्हणजे पालन करणारा . तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात . स्फटिक माळही चालते . महिला देखील हा जप करु शकतात . प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही .भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे . ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते .  तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात . हे अतिशय भयानक मायाजाळ आहे . त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही . याला आंतरिक चकवा असे म्हणतात . ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात . काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? . त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे . पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे . साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात . श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही . ती आपोआप साध्य होते . श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल . भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते . मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पाय- या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत . 
१ प्रमुख - श्री कालभैरव 
२ उपप्रमुख - बटुकभैरव 
३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४ अष्टभैरव - स्मशानभैरव 
५ नग्नभैरव 
६ मार्तण्डभैरव 
७ कपालभैरव 
८ चंडभैरव 
९ सन्हारभैरव 
१० क्रोधभैरव
११ रुरुभैरव 

श्री कालभैरव पाताळवासी आहेत . त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात . नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात . त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात . श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही . नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी . त्याची साधना निर्गुणात सरस बनविते . आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे . श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे . त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल . धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत . त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल . ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये . नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा . श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते . श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही . ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात . पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात . मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी . सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं . आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात . ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय  योगापर्यंत घेवुन जातात.

श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏💐

Sunday, 29 January 2023

व्यायाम

ह्या कडव्यातून तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचे महत्त्वच पटवून दिले आहे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. व्यायामाने हा आळस दूर होतो. अंगात तरीतरी येते. कामातील आपला उत्साह वाढतो. व्यायाम आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे.

आपल्या मोबाईलची battery संपली असता, मोबाईल बंद पडतो. तसेच आपल्या शरीराचे आहे मित्रानो. शरीराला व्यायाम असेल तर आपली हालचाल मंदावते.

अगदी छोटी छोटी कामे केली असता ही दम लागतो आणि हळू हळू आपले शरीर हे आजारांचे घर बनते. हे सगळं टाळायच असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. व्यायामामुळे आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असते ती कशी ते आपण पाहू या.  

वजन कमी होण्यास मदत होते

आजकाल वजनवाढ ही एक मोठी समस्या बनली आहे. वजन वाढले की आजार बळावतात. फास्टफूडमुळे झपाट्याने वजन वाढते. अशावेळी शरीराला व्यायामाची गरज आहे.

व्यायामामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. हिट वर्कआउट, चालणे, झुंबा यामुळे लवकर कलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते. 

हाडे मजबूत आणि बळकट होण्यास मदत होते

व्यायामामुळे हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. वेटलिफ्टिंग, डंबेल्सचा वापर करून व्यायाम  यामुळे तुमची हाडे आणि स्नायूंवर चांगला ताण येतो.

वयोमानानुसार शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील बोन डेन्सिटी वाढते. खेळाडूंना हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते. 

हृद्य व्यवस्थित काम करावे यासाठी

आजकाल चुकीच्या जीवनपद्धतीमुळे कमी वयात देखील हार्ट attackचे प्रमाण वाढले आहे. चुकीचा आहार, फास्टफूडचे  जास्तीत जास्त सेवन, यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची निर्मिती वाढून हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयाचे काम ही सुरळीत चालू राहते. त्यामुळे हृद्य जपण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. 

मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

भारतात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

नियमित व्यायामाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे माधुमेहाचा धोका संभवतः नाही किंवा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

आर्युर्मान तसेच शारीरिक क्षमता वाढते

व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती | काम करण्याची || असे संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कवितेत सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की, व्यायाम केल्याने शरीराला तंदुरुस्ती मिळते. काम करण्याची स्फूर्ती मिळते. 

आपल्याला अधिक कार्यक्षम वाटते. त्यामुळे शारीरक काम करताना थकवा जाणवत नाही. शारीरिक क्षमता वाढते तसेच योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आपले आयुष्यमान देखील वाढते.

वाईट जीवनशैलीचा आपल्या शरीरावर वाईटच परिणाम होत असतो. त्यामुळे व्यायाम आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे. 

मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी

व्यायाम केल्याने आपले मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होते. आपले शरीर निरोगी असेल तर आपले मन देखील निकोप राहते.

मनात वाईट विचार येत नाही. नियमित व्यायाम केल्याने ताण, तणाव, डिप्रेशन या सारख्या मानसिक आजारापासून दूर राहता येते. 

मेंदूचे काम सुरळीत चालण्यासाठी

आपल्या मेंदूचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा होतो.

यामुळे विचारशक्ती, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. शरीराची ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. 

आजारांवर मात

आजकाल मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा,  गुडघेदुखी हे खूप सामान्य आजार झाले आहेत. परंतु हे शरीरासाठी चांगले नाहीत. या आजारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे.

यासोबतच अपचन, संधिवात यासारखे आजार देखील होण्यास मदत होते. व्यायामामुळे चयापचय क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. आपल्या फुफ्फुसाची क्षमत वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम केल्याने शारीरिक तसेच मानसिक आजार दूर ठेवता येतात Importance Of Exercise In Marathi. 

व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या अशा की – व्यायाम शक्यतो सकाळच्या वेळी करावा. व्यायाम रिकाम्या पोटी तसेच जेवण केल्यावर लगेच करू नये. शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करावा. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडावा.

व्यायामाचे प्रकार

व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत – यामध्ये एरोबिक व्यायाम, अनेरोबिक, स्ट्रेचिंग आणि Balancing याचा समावेश आहे. या चार व्यायाम प्रकारा अंतर्गत योगा, पोहणे, नाचणे, जिम, चालणे, पळणे अशा व्यायामांचा समावेश होतो. 

व्यायामाबरोबरच फळेही आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात.

निष्कर्ष

Importance Of Exercise In Marathi आजच्या आधुनिक जीवानात माणसाने वेगवेगळे शोध लावून आपले जीवन सोयीस्कर बनवले आहे. माणसाची कष्टाची कामे कमी झाली आहेत.

यामुळे हालचाल कमी होऊन याचा शरीरावर परिणाम होत आहे. कमी वयातच वेगवेगळे आजार माणसाला होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे. 

आज आपण पाहिले की व्यायाम केल्याने आपल्या शरीराला कसा फायदा होतो. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा ते एक तास व्यायाम करून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो. 


Thursday, 26 January 2023

आपण खरोखर कोण आहात

आपण खरोखर कोण आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा? अध्यात्मिक मार्गाचा उद्देश तुमच्या खऱ्या स्वभावाची समज प्रदान करणे हा आहे. तुम्ही शरीर, मन किंवा बुद्धी नाही. तू शाश्वत, दिव्य, शुद्ध रूप आहेस..! ज्यांनी आपल्या इच्छेला पूर्णविराम दिला ते धन्य. म्हणजेच ज्या जीवांची वृत्ती भौतिक जगतापासून, बौद्धिक भ्रमांपासून मुक्त आहे आणि आत्म-जागरणासाठी तयार आहे, त्यांचे जीवन खरोखर धन्य आहे. अध्यात्मिक विवेक निर्माण करून मनुष्य अनंत शक्ती आणि अनंत उर्जेचा मालक बनू शकतो., अध्यात्मिक प्रवास म्हणजे निसर्गाचा प्रवास. शुभ-दिव्यत्व आणि जीवनाच्या यशाची सर्व सूत्रे केवळ अध्यात्मात सामावलेली आहेत. अध्यात्म हा निसर्गाचा प्रवास आहे. मानवामध्ये अस्तित्वात असलेली शाश्वत महाशक्ती हे सर्वत्र मन-शावक, पूर्ण-आनंदाचे रूप आहे. निसर्गाचे हे सार्वत्रिक रूप हे त्याचे एकमेव धार्मिक परिणाम आहे, सनातनचे धार्मिक परिणाम म्हणजे सनातन. परमात्मा सर्व बाबतीत पूर्ण आहे, म्हणून त्याच्यामध्ये अपूर्णता नाही. या सत्याचे अनावरण म्हणजे - अध्यात्म. अध्यात्म हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहे. मानवी जीवन ही दैवी देणगी आहे. त्यामुळे त्याच्या खऱ्या स्वरूपाची प्राप्ती आणि जीवनाच्या उद्देशाची पूर्तता हे जीवनाचे ध्येय असले पाहिजे; हा अंतिम प्रयत्न आहे! ज्याप्रमाणे सोन्यासारख्या धातूंची अशुद्धता अग्नीत तापवून नष्ट होते, त्याचप्रमाणे भगवंताची कथा, सत्संग इत्यादी श्रवण केल्याने इंद्रियांचे दोष दूर होतात. देवाची कथा मानवी जीवनातील दु:ख दूर करते. म्हणूनच जर दुःखापासून मुक्ती असेल तर भगवंताच्या चरणी त्याची कथा ऐकण्यात मन एकाग्र करा. फक्त देवच सर्वांचे भले करतो. तो सर्वांचा  मित्र आहे. साधक हाच जो स्वतःमध्ये विचारांचा गर्भ तयार करतो. साधना करा आणि दररोज निरोगी विचारांना जन्म द्या. गरोदरपणात आई जे विचार मनात रुजवते, तेच विचार मुलाच्याही मनात येतात. म्हणूनच माणसाने नेहमी उच्च विचार आणि दैवी भक्तीमध्ये मग्न असले पाहिजे. त्यांनी ध्रुव चरित्राच्या कथेत म्हटले आहे की, ध्रुव लहानपणापासूनच भक्तीत मग्न होता. माणसाला आपल्या मुलांमध्ये देव आणि देवाप्रती भक्ती ठेवायला शिकवले पाहिजे. भागवत कथा माणसाच्या सर्व दुःखांचा नाश करते. अट अशी आहे की आपण ही मोक्षकथा खऱ्या अंतःकरणाने ऐकू, नंतर ध्यान करू आणि आपल्या जीवनात सद्गुण आत्मसात करू.ते घालू नका.  भागवत कथा हा पाचवा वेद आहे आणि तो परमात्म्याचे रूप आहे.  या जगाच्या प्रत्येक कणात परमेश्वराचा वास आहे. ती मिळवायची असेल तर सत्कर्म करा, सत्संगात सहभागी व्हा, सुमिरन करा. भागवत कथा ऐकल्याने भगवंताच्या चरणी प्रेम तर वाढतेच, सोबतच भागवत भक्तीही प्राप्त होते, म्हणून भगवंताची कथा श्रवण करत राहिले पाहिजे. भगवंताच्या भक्तीनेच मानवता प्राप्त होते, म्हणूनच भागवत कथेत मानवी जीवन यशस्वी करण्याचे सामर्थ्य आहे.आणि ते ऐकून आपण पापापासून मुक्त होतो. श्रीमद्भाववतगीतेला अध्यात्माचा दिवा म्हटले आहे, त्याचे फलित अध्यात्म आहे. अध्यात्माचा अर्थ म्हणजे आपल्यातील चैतन्य घटक जाणून घेणे आणि पाहणे, म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेणे किंवा आत्म-जागरूक असणे. गीतेच्या आठव्या अध्यायात स्वतःच्या स्वरूपाला म्हणजेच आत्म्याला अध्यात्म म्हटले आहे. “परमम् सभावोध्यात्मुच्यते …” हे सर्वज्ञात आहे की आत्मा हा परमात्म्याचा एक भाग आहे. अध्यात्माची अनुभूती सर्व प्राणिमात्रांमध्ये सारखीच असते. स्वत:चा शोध प्रत्येकजण जे काही करत असेल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे, भगवंताच्या असीम प्रेमाचा एक थेंब मानवामध्ये आढळतो, ज्यामुळे आपण त्याच्याशी एकरूप होतो, परंतु काही काळानंतर तो नाहीसा होतो आणि आपण निराश होतो. देव सर्वात दयाळू आहे जो आपल्या छोट्या प्रयत्नांनी वितळतो. अध्यात्म हे स्वतःच्या स्वभावाकडे परतण्याच्या प्रवासाचे नाव आहे. जिथे शांतता, आनंद आणि कायमचे समाधान आहे. अध्यात्म आंतरिक उर्जा जागृत करते, स्वतःची अग्नी. विषम आणि प्रतिकूल परिस्थितीत मोठे कसे व्हायचे ते सांगते? स्वतःचे बाह्य विकास म्हणजे विज्ञान आणि आंतरिक विकास म्हणजे अध्यात्म. संपूर्ण वसुधाला एक कुटुंब मानणे हीच अध्यात्माची प्रेरणा आहे. बाह्य जगात जगाला एका सूत्रात बांधण्याचा आधार विज्ञानाने मांडला आहे, तर अंतरंगात तोच उद्देश अध्यात्माने पूर्ण होतो. अध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे. अध्यात्म ही जीवनाची नैसर्गिक मागणी आहे. जेव्हा ते पूर्ण होऊ लागते, तेव्हा अचानक आनंद, उल्हास, जीवनात धन्यता, उत्सव, स्थिरता, आनंद इत्यादी जाणवतात. ज्याच्या आगमनावर कोणताही गोंधळ आणि भीती नाही,  मग संघर्षही कुठे राहतो? अध्यात्म म्हणजे तोटा-लाभ, जन्म-मृत्यू, कीर्ती-अपयश या द्वैतांच्या वर जाणे. जो चैतन्याला प्रासादिक बनवतो, तेच अध्यात्म. अध्यात्म हे निसर्गाचे नाव आहे. जो आपल्याला निसर्गाकडे, आपल्या अस्तित्वाकडे, घेऊन जातो, त्यालाच 'अध्यात्म' म्हणतात. महापुरुषांची शिकवण नीट कशी ऐकायची हे कळले तर जीवनातील शंका आपोआपच संपतील. म्हणून आत्म-तत्त्वाचे तत्त्वज्ञान, प्रबोधन आणि उत्थान यासाठी चार पायऱ्या आवश्यक आहेत - आत्मनिरीक्षण, आत्म-सुधारणा, आत्म-निर्मिती आणि आत्म-विकास., ,

स्त्रीयांचे अलंकार आणि महत्व....


स्त्रियांनी अलंकार धारण करण्याचे महत्त्व आणि अलंकार धारण केल्यामुळे होणारे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊ या. विधवा स्त्रियांनी अलंकार का घालू नये, याविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

१. स्त्रियांनी अलंकार परिधान करण्याचे महत्त्व आणि लाभ
अ. स्त्रियांनी अलंकार परिधान करणे, म्हणजे स्वतःतील देवत्व जागृत करणे
१. अलंकारांमुळे स्त्रीच्या शरिरात असलेल्या तेजतत्त्वरूपी आदिमायेचे आणि आदिशक्तीचे प्रकटीकरण होते.

२ शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे देवतेच्या शक्तीरूपाची केलेली पूजा असणे : स्त्री हीदेवतेच्या अप्रकट शक्तीचे प्रतीक आहे. शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे त्या शक्तीरूपाची केलेली पूजा आहे. अलंकारांद्वारे स्वतःमध्ये शक्ती प्रकट करून स्वतःसह इतरांनाही तिचा लाभ करून देणे, हे तिचे कार्य आहे.’

३. अलंकार घातलेली स्त्री शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ असणे : ‘अलंकार घातलेल्या स्त्रीकडे पाहिल्यावर पूज्यभाव निर्माण होतो. त्यामुळे स्वतःमधील आणि इतरांचीही शक्ती जागृत होते. हे एक लहानसे शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ आहे आणि देवतेचे सतत स्मरण करून देणारी प्रतिमा आहे. स्थुलातील पूर्णत्वाच्या दिशेची ही वाटचाल सगुण उपासनेतून निर्गुणाकडे घेऊन जाणारी आणि निर्गुणाची अनुभूती देणारी आहे.’

आ. स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर करणे
‘अलंकार परिधान करण्यामागे जिवाचा भाव असेल, तर जीव असत् कडून सत् कडे जातो. त्यामुळे प्रत्येक स्त्री-जिवाने संस्कृतीचे पालनकरून स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर केला पाहिजे.

इ. हिंदु धर्माने स्त्रीत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्यातील शक्तीतत्त्व टिकून रहाण्यासाठी केलेली अलंकारांची रचना
१. ‘विशुद्धचक्र : हे गळ्यात कंठमणी घालून जागृत ठेवले जाते.

२. अनाहतचक्र : हे मंगलसूत्राच्या वाट्यांच्या पोकळीतील तेजस्वरूप लहरींच्या स्पर्शाने जागृत ठेवले जाते.

३. नाभीप्रदेश : मेखलेचा, तसेच कांचीचा बंध नाभीप्रदेश, तसेच कटिबंधप्रदेशाला शक्तीतत्त्वाच्या बळावरकार्य करण्यास उद्युक्त करणारा असतो.

४. पाय : पायांतील पैंजणाचा नाद आणि जोडवी पाताळातून येणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून स्त्रीचे रक्षणकरतात.
वरील उदाहरणांतून हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येते.’

ई. अलंकारांमुळे स्त्रीचे रज-तमात्मक लहरींपासून रक्षण होणे
‘स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. स्त्री हीमूलतःच रजोप्रवृत्तीची असल्याने तिच्या अंगावर असणारे अलंकार तिचे प्राकृतिक स्वरूपात वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या भ्रमणातून उत्पन्न होणार्‍या ऊर्जेपासून रक्षण करतात. प्रत्येक अलंकार स्त्रीला कवचरूपी (चिलखतरूपी) संरक्षण देतो; कारण स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त संवेदनशील असल्याने ती वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना चटकन प्रतिसाद देते; म्हणून पूर्वापार अलंकार वापरून तिचे संरक्षणकेले जाते.

उ. अलंकारांमुळे वाईट शक्तींना प्रतिबंध होण्यास साहाय्य होणे
१. अलंकारांमुळे त्या त्या अवयवाभोवती चैतन्याचा आकृतीबंध बनतो आणि वाईट शक्तींना पुढे प्रवेश करणे कठीण होते, उदा. पायांत पैंजण अन् हातांत बांगड्या घातल्याने वाईट शक्तींना पाय आणि हात यांद्वारे शरिरात सहज प्रवेश करता येत नाही.

२. आजकाल लग्न झालेल्या काही स्त्रियांच्या मनात ‘हातांत पाटल्या-बांगड्या घालू नयेत; रात्री झोपतांना बांगड्या आणि मंगळसूत्र काढून ठेवावे’, असे विचार येतात. असे विचार वाईट शक्तींनीच स्त्रियांच्या मनात घातलेले असतात. त्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांवर आक्रमण करणे सोपे जाते. प्रत्यक्षात पाटल्या, बांगड्या आणि मंगळसूत्र यांमुळे हात अन् गळा या अवयवांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.

३. काही स्त्रियांना घाम येत नसतांना गळ्यावर पुरळ उठते आणि ‘मंगळसूत्र घातल्याने पुरळ उठले आहे’, असे वाटून त्या सोन्याचे मंगळसूत्र काढून खोटे (सोने न वापरता बनवलेले आणि वजनाने हलके असलेले) मंगळसूत्र घालतात. याचाही वाईट शक्तींना लाभ होतो. मंगळसूत्रामुळे गळ्याचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते.

४. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना स्त्रियांना अंगावरील अलंकार काढावेसे वाटतात. पूर्वी राण्यांना राग आल्यावर त्या क्रोधागारात जाऊन अंगावरील सर्व अलंकार काढून टाकत असल्याचेही आपण वाचले आहे.’

ऊ. सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकारांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होणे
ऊ १. अलंकारातील सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमणपरतवले जाणे
‘स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यावर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या शक्तींचा लवकर परिणाम होतो अन् तो जास्त काळ टिकतो. अलंकार बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते अन्त्रासदायक लहरींपासून स्त्रीचे रक्षण होते. स्त्रियांतील सात्त्विकता वाढावी आणि वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षणव्हावे, यासाठी स्त्रियांनी अलंकार घालावेत.

ऊ २. शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी कटीच्या (कमरेच्या) वरच्या भागातीलअलंकार सोन्याचे असणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) वरच्याभागात घालायचे अलंकार सोन्याचे असतात. तेजाचे संवर्धन करणार्‍या सोन्याचा वापर भूमीपासून वरिष्ठस्तरात (टीप १) कार्य करणार्‍या शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी केला गेल्यामुळे देहाच्यामध्यम आणि वरिष्ठ स्तरांतील सर्व दागिने सोन्याचे असतात. (मणिपूरचक्रापासून वरच्या चक्रांमध्ये चांगली शक्ती ग्रहण करण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते; म्हणून नाभीपासून वरच्या भागांवर तेज प्रक्षेपित करणारे सोन्याचे अलंकार धारण केले जातात.) सोन्यामुळे त्या त्या पट्ट्यातील क्रियाशक्तीरूपी वरिष्ठ वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते.

ऊ ३. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या कनिष्ठ लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीभागाच्या(कमरेच्या) आणि पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा वापर केला जाणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) खालच्या भागात घालायचे अलंकार चांदीचे असतात. चांदीची रजोगुणी चैतन्ययुक्त इच्छालहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने त्या त्या कार्याला पूरक अशा धातूचे अलंकार त्या त्या अवयवासाठी वापरले जातात. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या पृथ्वी आणि आप तत्त्वयुक्तत्रासदायक लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीप्रदेशाच्या अन् पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा विशेषत्वानेवापर केला जातो.’

ए. सौभाग्यालंकार म्हणजे स्त्रियांना त्यांच्या पातिव्रत्याची जाणीव करून देणारे माध्यम
१. ‘कुंकू, मंगळसूत्र, कंकण, जोडवी आदी घटकांच्या साहाय्याने रजोगुणाच्या सामर्थ्यावर विवाहित स्त्री अल्पकालावधीत पुरुषप्रधान शिवस्वरूप कर्तृस्वरूपाशी एकरूप होऊ शकते; म्हणून स्त्रीतील क्रियाशीलत्व जागृतकरून पतीच्या कर्तृभावात त्याला पुरेपूर साहाय्य करून कृती आणि कर्म यांची रजोगुणाच्या साहाय्याने योग्यसांगड घालण्यासाठी विवाहित स्त्रियांना त्या त्या अलंकारांचे कर्मबंधत्व घातले गेले.

२. स्त्रीला सौभाग्यालंकारांच्या माध्यमातून होणार्‍या तेजदायी लहरींच्या स्पर्शातून तिच्यातील पातिव्रत्याचीसतत जाणीव करून देण्याचे प्रयोजन केले गेले.

३. सौभाग्यालंकारांच्या बाह्य भानातून समाज एकपत्नीत्व आणि पातिव्रत्याचे संगोपन करून स्वैराचारापासूनमुक्त राहील, अशी योजना करणे कलियुगात अपरिहार्य ठरले.

४. सौभाग्यालंकार म्हणजे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासून रक्षण करण्याचा केलेला प्रयत्न :कलियुग हे रज-तमप्रधान असल्याने हा काळ स्वैराचाराला अनुकूल आणि साधनेला प्रतिकूल असा आहे. यायुगात स्त्रीरूपी पवित्रतेला किंवा सौभाग्यशीलतेला अलंकाररूपी तेजस्वितेचे कोंदण घातलेले आहे. यातेजस्वितेच्या बळावर तिच्या शीलाचे रक्षणही होते. सौभाग्यवती स्त्री ही मंगळसूत्र, कंकण, तसेचकुंकू या सौभाग्यालंकारांनी संरक्षित केलेली असल्याने तिला एक प्रकारे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासूनविभक्त करण्याचा प्रयत्न कलियुगात केला गेला आहे.’

२. विधवांनी अलंकार परिधान का करू नयेत ?
अ. सौभाग्यरूपी धारणेचा लय होतो, तेव्हा वैराग्य भावनेचा उदय होतो !
‘ज्या वेळी सौभाग्यरूपी धारणेचा लय होतो, त्या वेळी खर्‍या अर्थाने स्त्रीतील उत्पत्ती विषयक तेजधारणेने नटलेले बीज लोप पावते आणि त्याच ठिकाणी वैराग्य भावनेचा उदय होतो. तेजस्वीतेचा लय होणे, म्हणजेच अलंकाररूपी शृंगारत्व त्यागून अलंकार विरहित वैराग्य जीवनास आरंभ करणे.

आ. स्त्रीमध्ये वैराग्य भाव लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकारत्यागाची संकल्पना दृढहोणे
हा वैराग्यभाव स्त्रीमध्ये लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकार त्यागाची संकल्पना दृढ झाली. पूर्वीच्या काळी स्त्रिया तेजरूपी साधनेने परिपक्व असल्याने त्यांच्यात हळूहळू साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याला वैराग्यभाव निर्माण होत असे; परंतु आता साधनेच्या अभावामुळे अलंकार त्यागातून विधवा स्त्रीमध्ये वैराग्य भावाची निर्मिती होऊन तिचा लवकर मोक्ष प्राप्तीकडे प्रवास व्हावा, या उद्देशाने बाह्यांगाने विधवा स्त्रीसाठी अलंकार त्याग स्वरूपाची आवश्यकता भासली. अलंकारांच्या स्पर्शाने स्त्रीतील रजोगुण सतत जागृत अवस्थेत रहातो, तर अलंकार विरहिततेच्या भावनेतून रजोगुणाचा लय होऊन वैराग्य भावलवकर निर्माण होण्यास साहाय्य होते.’

३. व्यक्तीमत्त्वानुसार अलंकारांची निवड
‘व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्त्वाला पूरक अशा अलंकारांची निवड करते. सात्त्विक व्यक्ती सात्त्विकअलंकारांची, राजसिक व्यक्ती राजसिक अलंकारांची, तर तामसिक व्यक्ती तामसिक अलंकारांची निवड करते. सात्त्विक अलंकारांकडे पाहून भाव, चैतन्य, आनंद किंवा शांती यांची अनुभूती येते. राजसिक अलंकारांतून शक्तीची अनुभूती येते, तर तामसिक अलंकारांकडे पाहून त्रास होतो.’

Wednesday, 25 January 2023

जन्म मृत्यू

जन्म मृत्यू चे चक्र अव्याहत....सत्पुरुष
             
जन्म-मृत्यू-जन्म हे जे अव्याहतपणे चक्र सुरू असते, त्या चक्रातून फिरण्याची जी शिक्षा प्रत्येक जीवाला भोगावी लागते, त्यातून साधक-भक्ताची निश्चितपणे सुटका होते.  ह्यावर आपले* 
*चिंतन-भारले भाष्य करताना श्रीज्ञानदेव म्हणतात, ऊसापासून साखर करतात, परंतु साखरेपासून पुन्हा ऊस निर्माण करता येईल का? दुधापासून दही आणि दह्यापासून लोणी; लोण्यापासून तूप ही प्रक्रिया, परंतु त्या तुपाला पुन्हा घुसळून दूध निर्माण करता येईल का? ही अशक्य गोष्ट आहे. नदी उगमापासून सुसाट सुटते, वाटेतले सर्व अडथळे दूर करीत, समुद्राला जाऊन मिळण्यासाठी. ती समुद्र होऊन जाते. एकदा समुद्राला आपले अस्तित्व अर्पण केल्यावर नदी कधी तरी माघारी उगमापाशी येणे शक्य आहे का? ते शक्य झाले तरच हरीचे दास मोक्षपद न मिळवता पुन्हा माघारी जन्म घेतील. जे परम भक्त विविध प्रकाराने देवाची भक्ती करतात, नवविधा भक्तीच्या नऊ पायर्‍या अथक साधनेच्या बळावर पार करतात, ते भाग्यवान जीव हा भवसागर पार करून जातात. कापूर हा सुगंध अर्पण करतो. कापूरापासून शाई होत नाही. परंतु कापूराच्या शाईने जर अभंग लिहिता आले असते तर आपली जी छाया पडते ती आपल्याला आपल्याच हाताने चक्क उचलून घेता येईल. पण हे अशक्य आहे. श्रीज्ञानदेव म्हणतात की, ‘परमेश्वराची जे आर्त होऊन उपासना करतील, अखंड नामस्मरणात अष्टौप्रहर दंग होऊन त्याच्याच नामाच्या कुशीत आनंदात राहतील ते ह्या मर्त्य विश्वात कदापिही जन्म घेणार नाहीत.’ ज्ञानदेव महाराज खात्रीपूर्वक सर्वच परम भक्तांना असं वचन देतात.
शेत नांगरण्यापूर्वी ते जाळतात. आधीच्या पिकाचे जे शिल्लक असेल ते जाळतात. तसे, माझ्या प्रापंचिक वासना सगळ्या नाहीशा केल्याशिवाय परमात्मा येणार नाही. यासाठी महाराज दोन मार्ग सांगावयाचे. एक मार्ग- त्या प्रपंचाला आगच लावून टाकायची, पण ही फार मोठ्या माणसांची कामे आहेत. दुसरा मार्ग जर असेल तर ते शेत भगवंताच्या मालकीचे करावयाचे. मग सद्गुरूची खुबी अशी आहे म्हणाले की तो ते शेत न जाळता बरोबर करून घेईल. हे त्याचे काम आहे. पण मग त्याला तू अमुक कर म्हणून सांगता येणार नाही. ज्ञानामध्ये विरक्तीशिवाय उपाय नाही म्हणतात; परंतु भक्तीमध्ये "हे तुझे आहे तू सांभाळ" असे म्हणल्यानंतर त्याला काय करावयाचे ते तो करील. प्रापंचिक मनुष्य काही पूर्व पुण्यायीने सत्पुरुषाजवळ जातो. त्याला देव नको असतो, प्रपंच व्यवस्थित हवा असतो. हा सत्पुरुष काय करतो तर, एखादीजमीन मुरुमानी भरलेली असते. शेतकरी जसे दोन चार फूट खोल मुरूम काढतो, त्यात नवी माती घालतो, खत घालतो आणि पीक काढतो, तसे हा सत्पुरुष हळूहळू त्याच्या मनातला प्रपंच बाजूला करतो, त्यात भगवंताच्या नामाचे बीज पेरतो आणि पीक काढतो. त्याचे पीक बेताचेच आले तरी आल्याशिवाय राहात नाही. ही त्या सत्पुरुषाची कर्तबगारी आहे.

“सकळ जन हिताय 
श्री स्वामी समर्थाय नमो नमः” 
अवधुतचिंतन जय श्री गुरुदेव दत्त 
दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंमरा 
ब्रम्हां विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Il अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
Il ॐ श्री स्वामी समर्थ ll