-- -:♦ द्वारका नगरी पाण्यात का बुडाली ? ♦:- --
|| श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर
|| जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली
|| द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्री कृष्णा समवेत संपूर्ण
|| यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथांनुसार
|| “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची
|| नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख
|| कारणे सांगितली जातात.
|| एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि
|| दुसरी म्हणजे ऋषी मुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला
|| दिलेला शाप.
|| अर्थात, सदर पौराणिक कथा या काही द्वारकेला
|| जलसमाधी मिळाल्याचे सबळ पुरावे मानता येत नाहीत.
|| पण आजही त्या समुद्रात एक शहर आहे, जे अगदीच
|| महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवते. संशोधक आजही
|| पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य
|| उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
|| असो – तर आपण या कथा सविस्तरपणे जाणून घेऊया.
|| गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप
|| महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठीर पुन्हा एकदा
|| सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने
|| महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून
|| शाप दिला की,
|| ज्याप्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे
|| यदुवंशाचा सुद्धा नाश होईल.
|| ऋषींनी दिला होता सांबाला शाप
|| महाभारत युद्धानंतर जेव्हा ३६ वे वर्ष सुरु झाले तेव्हा
|| अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत
|| अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी
|| विश्वमित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदु
|| वंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले.
|| त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात
|| ऋषींसमोर उभे गेले आणि ऋषींना सांगितले की,
|| ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल ?
|| सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला
|| अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधीत होऊन शाप
|| दिला की,
|| श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या
|| पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ
|| निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि
|| क्रोधी लोक स्वत:च स्वत:च्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल.
|| त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम
|| वाचतील.
|| श्रीकृष्णला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री
|| होती की हा शाप खरा ठरणार.
|| ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी
|| मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला
|| समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो
|| समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर
|| अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली.
|| नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर
|| माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री
|| झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात
|| असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका
|| आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले.
|| श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले,
|| तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा
|| होण्याची वेळ समीप आली आहे.
|| हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्षाच्या तेराव्या
|| दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या
|| युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता.
|| गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर
|| श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर
|| जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मन राखून
|| सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन
|| राहू लागले.
|| प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि
|| वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली.
|| तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला.
|| हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याचावर
|| हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र
|| प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला.
|| सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले,
|| परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक
|| वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला.
|| आपला पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधीत होऊन
|| श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच
|| क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये
|| परावर्तीत झाले.
|| त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते
|| समोरचाचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास
|| तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास
|| सुरुवात केली.
|| श्रीकृष्णाच्या डोळ्यादेखत सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध
|| आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने
|| रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला.
|| तेव्हा त्यांनी आपला सारथी दारूक याला सांगितले की,
|| तू हस्तिनापूराला जा आणि अर्जुनाला या सर्व
|| प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये.
|| दारूकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण
|| पुन्हा द्वारकेला परतले त्यांनी सर्व गोष्ट पिता वासुदेवांना
|| सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दु:ख वासुदेवलाही झाले.
|| ही वार्ता वडिलांना ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला
|| भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले कि
|| बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या
|| श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या
|| उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते
|| जमिनीवर पडून राहिले.
|| ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते, त्याचवेळी जरा
|| नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने
|| लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला.
|| बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे
|| गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप
|| झाला.
|| तेव्हा –
|| “हे सर्व विधिलिखित असून, माझा अवतार असाच
|| संपणार होता…”
|| हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते
|| स्वर्गात निघून गेले.
|| इकडे दारूक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात
|| दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन
|| त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला
|| आला, तेव्हा तेथील भयावह परीस्थिती बघून त्याला खूप
|| दु:ख झाले.
|| वासुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन
|| जाण्याची विनंती अर्जुनाला केली. कारण श्रीकृष्णाचे
|| अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा
|| देखील अंत होणार होता.
|| अर्जुनाने वासुदेवाची ही विनंती मान्य केली आणि
|| आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना
|| होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासीयांनी
|| अर्जुनाची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रस्थानाची तयारी सुरु
|| केली.
|| दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवानी आपल्या प्राणाचा
|| त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार
|| केले. वासुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सुद्धा
|| वासुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने
|| प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा
|| अंतिम संस्कार केले.
|| सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि
|| नगरवासीयांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेला.
|| सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय
|| द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून
|| सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच
|| द्वारकेला जलसमाधी मिळाली.
|| बुधवार :--- { ०५ / ०७ / २०२३ } !............
No comments:
Post a Comment