Monday, 3 July 2023

देविदास गिरे - अकोला

🔴 माझे गुरु ! माझी बायको !! 🔴

आज गुरुपोर्णीमा - आजचा मंगल पवित्र दिवसं.... गुरु म्हणजे नक्की काय ?  माझ्या मते.. जी व्यक्ती आपल्या जीवनाला कलाटणी देते, ज्यामुळे आपल भलं होते, ज्या व्यक्ती मुळे विचार आचर सुधारतो... ती व्यक्ती म्हणजेच गुरु... हे माझ मत आहे... कुणाला पटेलचं अस काही नाही...

आयुष्याचे प्रवासात कळतं नकळतं अनेक लोकांशी आपला संपर्क येतो, ते आपले गुरुच मानलं तर त्यात वावगे काहीच नाही.... अस मला वाटतं... संतानी पण हे मान्य केलेलं असून कुण्या तरी संताने वेश्येला पण आपले गुरु मानलेले आहे.... 

निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताई... या भावडांना छळणारा विठोबा खेचर, यांने तर चक्क सोपानदेव यांनाच गुरु केले अन ते, अंतर:बाह्य बदलून, विठोबाशास्त्री झाले.... वाल्या दरडोखोराने नारदाला गुरु मानले अन वाल्याचा वाल्मीका झाला...

गुरु दर्शनाने म्हणा की देव दर्शनाने म्हणा एक उर्जा प्राप्त होते.... गुरुंची शक्ती विचार बदलतात...  विचार बदलला की आचारण... नंतर मनुष्य अंदरुन बाहेरुन बदलून जातो... अन त्याची श्रध्दा अधिक दृढ होते.... 

तसचं देवाचे प्रतीपण... आपण वारी करतो, पुजा करतो, प्रार्थना करतो, पारायण करतो, प्रवचनाला जातो, किर्तनाला जातो....  यात जर सातत्य ठेवलं तर विचार बदलतात... नंतर आपोआप आचार वर्तन वागनं  बदलून  जाते.... बदलाची जाणीव आपणाला झाली की, श्रध्दा अधिक दृढ होते... 

माझ ही तसचं आहे... आईवडीलांनी घडवलं... भावाने मार्गदर्शन केलं... माझे हे तिन्ही गुरु या जगात नाहीत... मला तारलं एका व्यक्तीनेच... ती व्यक्ती माझ्या जीवनात आली.... अन उलथापालत झाली... मी आज जो उभा आहे... त्या व्यक्ती मुळेच... ती व्यक्ती म्हणजे माझी बायको... माझे गुरु ! माझी बायको !!... हो हो माझी बायकोच... अजून तरी कुणाला गुरु करण्याच काम पडलं नाही, अन त्या फंदात ही मी पडलो नाही, पडणारपण नाही....मी सामान्य व्यक्ती... कोण मला शिष्य करणार, हा ही एक प्रश्न आहेच.... असो

आयुष्याचा प्रवास करता करता.... उंच उंच शिखरावर पोहचलो.... रिटायर्ड झालो... शिखरावरु खाली नजर जाता, डोळे फाकत होते... अर्थात मागे वळून बघत असता, माझ मलाच नवलं वाटतं होत, नवलं वाटतं आहे... होतो कुठं, आहे कुठं.... ते माझ्या या तीन गुरुचीचं कृपा....

रिटायर्डमेन्टचे अगोदर जो होतो, तो आज नाही... आज तो बाप नाही, आज तो पती नाही, आज तो सासरा नाही, आज तो भाऊ नाही, आज तो मी मी नाही, मी मी करणारा चिडचिडा रागीट आदडआपट करणा नाही..... आज आहे, शांत शांत.... विचारशुन्य असलेला देविदास आहे मी...
गुरु म्हणजे... मंत्र देतो, हातात धागा बांधतो, गळ्यात माळ टाकतो, डोक्यावर हात ठेवतो तो गुरु... पुर्वी होत तस, गुरुला ही शिष्याची काळजी असायची... यातूनच किती तरी संतमहात्मे घडले... अन त्याचमुळे आपली संस्कृती टिकून आहे... गुरु शिष्य परमंपरा महान आहे.... पुर्वी होती तसीच आता ही आहे... पण त्याला धंद्याच रुप आलं.... 

याला अनेक कारणे आहेत... पर्वी शिष्य उतराई म्हणून फुलनाफुलाची पाकळी गुरुदक्षाना म्हणून देत होते... पण आता तसं नाही... मागितल्या शिवाय शिष्य ही देत नाहीत... त्यामुळेच धंद्याच रुप आल, अस आपणाला दिसतं.... पण दिसते तस नाही... मिळालेल्या पैश्यातून ते सामाजीक विधायक लोकउपयोगी कार्य करतात.... विकासाला हातभार लावतात... पण शिष्य काय करतात.... हा एक संशोधनाचा विषय आहे...

गुरु हे गुरुच असतात... पण शिष्य हे शिष्य असतातच अस काही नाही... गुरु करायचा म्हणून गुरु करतात... छान प्रवचन असते, काळजाला हात घालतात... मगं काय शेकडो लोक गुरु करण्यासाठी धडपडतात.... शेकडोने लोक असतात.... महाराज लोकांचीही मजबुरी असते... एका लाईनीत बसवतात... अन महाराज एकएकाचे डोक्यावर हात ठेवतं, चालतात अन निघून जातात... झाला गुरु.... झाला शिष्य.... शिष्य बाहेर येतो... खिशात हात घालतो... एक पुडी काढतो... दाताने तोंडतो.... तशीच तोंडात खाली करतो.... खातो ते जहर असते.... त्या पुडीवर वॉर्निंग असते... असा हा शिष्य...

डोक्यावर हात ठेवून झालेले शिष्य, जे आठदहा शिष्य... सक्रीय असतात ते... प्रवचनाचे दिवसी जस वातावरण असते, ते टिकविण्याचा आटापिटा करतात...  दरवर्षी गुरुपोर्णीमेला किंवा प्रसंगारुप काहीना काही उत्सव साजरे करतात... त्यासाठीच्या रक्कमेची तरतूद...  वर्गणी जमा करताता... आपली कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढतात, वर्गणी जमा करतात... या सक्रीय शिष्यांना माझा नमस्कार, मानाचा मुजरा... 

नमस्कार, मानाचा मुजरा..... पण त्यांनी आग्रह केला की... महाराजांन प्रती असलेली उरली सुरली श्रध्दा संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.... अन ते करतात आग्रह... मोठी रक्कम टाकून, सरळ पावतीच हातात देतात.... कारण ते गुरुभाऊ असतातना.. 

ही मोठी रक्कमच त्याला भानावर आणतं... कारण भावनेच्या आहारी जावून गुरु केलेला असेल तर... अन असत ही तसचं, अस मला वाटतं... भारावण्या लायक म्हणा की संमोहिताला पोषक अस  प्रवचनाचं वातावरण असतं, त्यातुनच एकाच वेळी शेकडो व्यक्ती, गुरु करण्याला तयार होतात... अस माझ निरिक्षण आहे...

असल्या शिष्यांची भावना टिकविण्याच काम, या सक्रीय शिष्यांवर असते... गुरुबंधूच नात टिकवणं याचेच हाती असते... नाही तर आपण बघतोच, जिथं अपेक्षा वाढली, तिथं भावा भावात दुरावा झालेला दिसतो... मगं गुरु गिरु गेले उडतं... असली कुजबूज मी ऐकलेली आहे....

माझ्या पाहण्यात.... अनुभवलेला एकच धार्मिक परिवार आहे... तो म्हणजे पांडूरंगजी शास्त्री, दादाजी आठवले यांचा स्वाध्याय परिवार... या परिवाराची शिस्त वाखाण्या जोगी आहे... चप्पला बुट एका रांगेत व्यवस्थीत ठेवतात... ना गडबड - ना गोंधळ... ना कुठ जाहिरात... हे स्वाध्यायी भाऊ.... खरच एकमेकांचे गुरुबंधूच... कुणा कडून ही काही काही अपेक्षा नसते... स्वत:च ते सक्रीय कार्यकरते असतात... त्यांची भावफेरी असते... ते घरोघरी जातात... जोडप्याने जातात, भेटतात.... आत्मयतीने चौकशी करतात... दोन शब्द योगेश्वरा बद्दल सांगतात.... कुठ ही, कुणाचे ही घरी पाणी ही पित नाहीत... गांवो गांवी जातात.... त्याचा मुक्काम असतो.... मुक्काम असलेल्या घरी ते फक्त पाणी घेतात... स्वयंपाकाचा शिधा आटा, स्टोव्ह किंवा छोटस सिंलेडर सोबतच नेतात... कुठ जाण्यच काम पडलं तर.... स्व:खर्चाने जातात... स्व:खर्च करतात... आर्थीक भुरद्ड सोसतात... खरच सांगताना मला आनंद होत आहे... याचे पुढे आदराने माझी मान झुकते... त्याच्यात मला योगेश्वराचं कृष्णाचं दर्शन होते, ऐवढ निश्चित..... किती ही लखपती करोडपती असो, तो पण साधा स्वाध्यायीच... 
शिक्षक प्राध्यापक लेक्चरर प्रोफेशर... हे गुरु स्थानीच, या गुरु लोकांना खुप खुप शुभेच्छा... माझा मानाचा मुजरा....

पण मला गुरुजींचा फारच कटू अनुभव आलेला आहे.... सर्वच गुरुजी असे नसतात... पण मला आलेल्या अनुभावरुन सांगत आहे... आजचे गुरुजी गरिबांचे तर अजीबात नाहीत... हुशार होतकरु गरिबां लेकरांचे पाठीवर थाप यांची कधीच पडत नाही... पैसेवाला जमीनदाराच्या बाबूचे पाठीवर थाप मारण्यासाठी लाचार असतात... असले बाबू असेना कसा ही त्याला डोक्यावर घेतात.... मॅट्रीक मध्ये आपटतात, काही दिवस गुरुजी खाली मान घालून चालतात हा भाग वेगळा... पॉलीटेक्नीक मध्ये जावू नये... म्हणून माझ्या वडिलांचे दोन गुरुजींनी कान भरले होते... उदाहरण देत ते याच त्याचं... टिकणार नाही... वडिलांना ही पटलं... मी दोन दिवस उपाशी... एक दिवस शेतात जावून बसलो... माझ्या भावाने समजवलं म्हणून जमलं... खर तर आईवडिलांन नंतर, माझा पहिला गुरु माझा मोठा भाऊ... रामदासभाऊ... माझ्या जीवनाला कलाटनीच मिळाली...  टेन्शन फ्री आयुष्य व्यतीत करीत आहे....

मनुष्याचे स्मरणात दोनच व्यक्ती असतात... एक जीवनला कलाटणी देणारा... अन दुसरा पैसे बुडवणारा... एकाला मनोमन पुजतो दुसर्याला शिव्या घालतो... हाच काय तो स्मरणात फरक.... म्हणूनच त्या दोन मास्तरांची ही आठवण झाली....

आजचा पवित्र दिवस... गुरुशिष्याची परमंपरा जपणारा दिवस... गुरु लोकांचा अनादर करण्याचा माझा इरादा नाहीच... सर्वच गुरु असे नाहीत... कुणाच मन दु:खल असेल तर क्षमा मागतो... पण कटू सत्य हेच आहे की, आजचे गुरुजी पैसे कसे कमवायचं यांच ज्ञान देनारा हा मास्तर आहे, प्राध्यापक आहे, लेकचरर आहे, प्रोफेसर आहे....

देविदास गिरे - अकोला
गुरुपोर्णीमा-दि. ३ जून २०२३

No comments:

Post a Comment