Saturday, 30 September 2023

तुमचे विचार सकारात्मक व्हावेत याकरता ‘हे’ 7 उपाय करा

तुमचे विचार सकारात्मक व्हावेत याकरता ‘हे’ 7 उपाय करा..


सकारात्मक विचार करणे आणि ते आचरणात आणणे ही आपल्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे. एक यशस्वी व्यक्तीने त्याच्या यशापर्यंत पोहचण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कारण, जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हाच तुम्ही यशाला गवसणी घालू शकता.

तुम्ही पुरुष आहात, म्हटल्यावर सकारात्मकता खूप आवश्यक आहे असे बिलकुल नाही. स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनीच सकारात्मक रहायला हवं, सकारत्मक विचार करायला हवेत. सकारत्मक विचार हे फक्त तुमच्या करिअरसाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी अतिशय गरजेचे आहेत.

जे लोक नकारात्मक विचार करतात त्यांच्या आसपास नेहमी नकारत्मक वातावरण असते. याचा परिणाम त्यांच्यासमवेत इतरांवर ही होत असतो. नकारात्मक विचार तुम्हाला मानसिक रित्या नुकसान पोहचवण्याचे काम करतात. तुमचे विचार सकारात्मक व्हावेत यासाठी काही पद्धती किंवा काही उपाय आजच्या या आर्टिकलमधून जाणून घेऊयात.

'या; पद्धती किंवा उपाय का आवश्यक आहेत ?

आजच्या धकाधकीच्या जीवनात पुरुष अनेकदा अस्वस्थ होतात. त्यांचे व्यस्त आयुष्य त्यांना केवळ आयुष्यात पुढे जाण्याचे संकेत देत असते. या व्यतिरिक्त त्यांच्या हातात नेहमी असलेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स त्यांना विविध डिजिटल दिशांकडे घेऊन जात असतात. जिथे आंतरिक शांती त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते.

हे वास्तव खरे तर अनेक पुरुषांच्या बाबतीत घडताना दिसते. त्यामुळे सकारत्मकता ही प्रत्येकासाठीच महत्वाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच आजूबाजूला नेहमी सकारत्मकता ठेवली पाहिजे. ती विचारात आणि आचरणात आणली पाहिजे.

सकारात्मकतेची ताकद जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही संकाटांचा सामना अगदी सहजपणे करु शकता. चला तर मग अशा काही उपायांबद्दल किंवा पद्धतींबद्दल जाणून घेऊयात की ज्याद्वारे तुम्ही सकारात्मक राहू शकाल.

मेडिटेशन आहे गरजेचे (Meditation).

चांगल्या नियोजनासह आणि योग्य वेळेचा तुम्ही चांगला वापर करण्यासाठी मेडिटेशन अर्थात ध्यान करणे हा अतिशय चांगला मार्ग आहे. ध्यान तुम्हाला एकाग्र होण्यास आणि तुमची स्मरणशक्ती वाढवण्यामध्ये मदत करेल.

तुमचे कुटुंब, तुमचा जोडीदार, मुले, मित्र-मंडळी, प्रत्येकजण आनंदी राहू शकतात. मात्र, यासाठी त्यांना योग्य वातावरण आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करावी लागेल.

योग्य विचार आणि योग्य नियोजन केले तर यश मिळेल. तसेच तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करावे लागेल. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. ध्यान केल्याने तुम्ही नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.

दृष्टिकोन बदला (Change Your perspective)

पुरुषांनी जर त्यांचा दृष्टिकोन बदलला तर अनेक अडणचींना ते सहजपणे मात देऊ शकतात. तुमचा आनंद आणि दु:ख हे तुमच्या दृष्टिकोनाशी निगडीत असतात. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करत असाल तर याचा परिणाम फक्त तुमच्यावरच नाही तर आसपासच्या वातावरणावर ही होत असतो.

जगात असे कित्येक लोक आहेत, जे कितीही कठीण परिस्थिती आली तरी देखील नेहमीच हसतमुखाने त्याचा सामना करत असतात. यासोबतच काही अशी ही लोक तुम्हाला भेटतील की त्यांच्याकडे सगळं काही आहे मात्र, तरी ही ते दु:खी आहेत. त्यामुळे तुम्हाला ठरवायचे आहे की, तुम्ही तुमच्या आयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहात ? सोप्या की कठीण ?

आरोग्याकडे लक्ष द्या (Focus on Health)

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, प्रत्येक माणूस व्यस्त आहे आणि कदाचित ते इतके व्यस् आहेत की त्यांना स्वतःसाठी वेळ नाही. या कारणांमुळे त्यांचे वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्हींचे एकत्रीकरण झाले आहे, याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो.

तुम्ही खरच इतके खुश आहात का ? जितके खुश तुम्ही असायला हवेत ? नाही ना..! आपण सर्वजण इतके बिझी झालो आहोत की, स्वत:च्या आनंदाविषयी विचार करणे आपण विसरुन गेलो आहोत.

त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या स्वत:ची काळजी घेणे, आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून थोडासा तरी वेळ स्वत:साठी काढा. हा वेळ केवळ तुमचाच असेल आणि तुमच्यासाठीच असेल. तुमचे सकारात्मक विचार हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

आठवड्यातील कोणत्याही एका दिवसाची निवड स्वत:साठी करा आणि त्यादिवशी व्यायामाकडे आणि फिटनेसकडे लक्ष द्या. अशा प्रकारे तुम्ही बिझी शेड्यूलमधून वेळ काढून स्वत:ला फिट ठेवू शकता.

हेल्दी डाएट घ्या (Take Healthy Diet)

काय हेल्दी डाएटचा सकारात्मक विचारांशी काही संबंध आहे का ?

या प्रश्नाचे उत्तर आहे हो. हेल्दी डाएटमुळे तुमच्या शरीराचा विकास होतो. हेल्दी डाएटमुळे आपल्या आरोग्याला विविध प्रकारचे पोषण तत्वे मिळतात. जसे की, कर्बोदके, प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे, इत्यादी.  जेव्हा ही सर्व पोषणतत्वे तुमच्या शरीरामध्ये पोहचतील तेव्हा तुमचे आरोग्य ही चांगले राहील.

चांगले आरोग्य म्हणजे अभिनेत्यासारखे सिक्स पॅक्स नव्हे किंवा अभिनेत्रींसारखी झीरो फिगर नाही. जेव्हा तुमचे शरीर हेल्दी राहील तेव्हा तुमचा मेंदू ही हेल्दी राहील आणि हेल्दी मेंदूमध्येच चांगले विचार येतील आणि तुम्ही सकारात्मक विचार करु शकाल.

हेल्दी लाईफस्टाइल स्विकारा (adopt healthy lifestyle)

निरोगी राहण्यासाठी पुरुषांनी निरोगी जीवनशैलीचा स्विकार करणे हे आवश्यक आहे. तसे पाहिले तर पुरुष असो किंवा महिला दोघांनीही वेळेवर झोपणे, सकाळी वेळेवर उठणे, व्यायाम आणि मन:  शांतीसाठी प्राणायाम करणे फायदेशीर आहे.

डॉक्टरांच्या मते, जे पुरुष रात्री 5 तास किंवा त्यापेक्षा कमी तास झोपतात. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, शरीराची हालचाल कमी होणे आणि निद्रानाश आदी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जर तुमची जीनशैलीच बिघडली असेल तर तुमची सतत चिडचिड होईल. त्यामुळे तुम्ही तणावग्रस्त व्हाल आणि तुमच्या मनात नकारात्मक विचार डोकावू लागतील.

त्यामुळे पूर्ण झोप घ्या आणि सकारात्मक, अ‍ॅक्टिव्ह रहा. यामुळे तुमच्या कामामध्ये आणि विचारांमध्ये सकारत्मकता आणि अ‍ॅक्टिव्हपणा दिसेल. त्यामुळे तुम्ही तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवणे हे गरजेचे आहे. सोबतच भरपूर सकारात्मक ऊर्जा ठेवा.

सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना भेटा (Meet positive people)

तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्या विचारांवर परिणाम होत असतो. कधीकधी तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी निगडीत काही गोष्टींमुळे नकारात्मक विचार करायला सुरुवात करता. त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये सकारात्मक विचारांच्या नोट्स वापरा. जेणेकरून तुमची विचारसरणी आणि विचार हे सकारात्मक राहतील आणि तुम्ही लवकर गिव्ह अप करणार नाही.

हसत रहा, आनंदात रहा (Smile, kept smiling)

तुम्ही भले ही तुमच्या आयुष्यात व्यस्त असलात तरी विचार करुन बघा की तुमच्या कुटुंबीयांनी तुम्हाला जर हसताना पाहिले तर त्यांना किती ऊर्जा मिळेल ? तुम्हाला असे खुश आणि हसताना बघूनच त्यांना फार आनंद होईल.

तुमची एक प्रेमळ अशी स्माईल तुमच्या कामावर, सहकाऱ्यांवर नेहमीच चांगला आणि सकारात्मक परिणाम करणारी ठरेल. भले ही मग किती ही नकारात्मकता असू द्या, परंतु, तुमची एक गोड स्माईल तुम्हाला सकारात्मक ठेवण्यात सक्षम असेल.

जर तुमच्या आयुष्यात आनंद आणि हसणं असेल तर हे जीवन परिपूर्ण आहे. आनंदी राहण्याचे आणि हसत राहण्याचे एक शास्त्रीय कारण देखील आहे, तुम्ही जितके आनंदी असाल तितकेच तुमच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असेल. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील आणि तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता डोकावणार ही नाही. सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. 

Friday, 22 September 2023

कावळ्याची गोष्ट -संजय सोपारकर

ही पोस्ट खरे तर कावळ्याला समर्पित आहे.. मी माझ्या जुन्या फ्लॅट मध्ये मी कावळ्याला नेहमी जेवण आणि पाणी ठेवत होतो..हा क्रम १५ वर्षापासून चालू आहे.....या कावळ्याची एक फॅमिली होती .कावळा त्याची बायको आणि २ पिल्ले... त्या कावळे कुटुंबाला आता माझ्या घरी येऊन जेवण्याची सवय लागली..ते माझ्या खिडकीच्या समोरच्या झाडावर येऊन माझ्या खिडकी वर जसे काय लक्ष च ठेवू लागले..आम्ही सुध्धा आमच्या घरात नवीन काय पदार्थ केला तर आधी कावळ्याला देत होतो..त्याला पदार्थ करतानाचा सुगंध आला की लगेच तिथे २/३ कावळे हजर होत असत.मात्र फक्त एक दोन वेळेसच कावकाव करत असतं.जसे काय त्यांना माहीत होते पदार्थ तयार झाल्यावर आधी त्यांच्याच ताटलीत पडणार .फक्त ओरडुन इशारा देत असत की आम्ही वाट बघत आहोत.अगदी हक्काने मागत असत..

पुढे फ्लॅट बदलण्याची वेळ आली .शेवटचे काही दिवस आमचे सामान नेताना बघून कावळा पण थोडा अस्वस्थ झाला होता. आणि कावळा कुटुंब पण तिथे येऊन खायला मागेनासा झाले जणू त्यांस वास्तव कळले होते.आम्ही तिथे पक्षांसाठी पाणी प्यायला पण ठेवत होतो. शेवटच्या दिवशी आम्ही आमचे शेवटचे सामान नेले तेव्हा ती ४ कावळ्यांची फॅमिली समोर झाडावर बसून आमच्याकडे नुसती बघत होती..दुपारची त्यांची ती जेवणाची वेळच होती .दुपारी  २ वाजले होते...पण मी दिलेले त्यांनी काहीही खाल्ले नाही जसे काय त्यांना खाण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता.....फक्त तिथे आम्ही एक पाण्याची जागा करून ठेवली होती म्हणजे एक पाण्याची थाळी होती त्यात आता पाणी नव्हते तेव्हा एक कावळा तिथे येऊन बसला आणि टोच मारून दाखवू लागला की आम्हाला पाणी द्या..त्यावेळी उन्हाळ्याची रखरख चालू होती..मी त्यात पाणी ओतले तर माझ्याकडे बघत बघत पाणी फक्त प्याला आणि उडून झाडावर जाऊन बसला..तो कावळा जवळ येऊन पाणी पिताना माझ्याकडे असा बघत होता की त्याच्या डोळ्यातील दुःखाचे भाव वाचता येत होते .मला पण त्यावेळी खुप भरून आले  आणि जुने दिवस आठवले..यातील एक वडील कावळा होता तो माझ्या हातून गाठे खात असे. खिडकीत टाकलेले  फरसाण तो खात नसे.. आता हे नवीन कावळे होते ती त्याचीच पोरे होती..याच्या सोबत साळुंकी..बुलबुल..पोपट..चिमण्या या पण येत असत आणि मग त्यांची मध्येच भांडणे होऊन गोड कलकलाट होत असे..

  कावळा हा अतिशय बुद्धिमान पक्षी म्हणून प्रसिध्द आहे..हे कावळे माणसाचे चेहरे ओळखतात..जेव्हा कावळा एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहतो तेव्हा  चेहरा त्याच्या दीर्घकाळ स्मरणात राहतो...कावळ्यावर जो कोणी हल्ला किंवा उपकार करतो त्या व्यक्तीचा चेहरा कावळे कधीच विसरत नाही आणि आपल्या जोडीदार यानाही याबाबत ते माहिती देत असतात.

तसेच त्यांस सात आकडे पर्यंत मोजता येतात म्हणजे सात माणसे वगैरे असे त्यांना चक्क मोजता येते असे सांगितले जाते..

आता नवीन फ्लॅट मधला कावळा जो खायला येतो तो तर असा शिष्ट मिळाला आहे की . त्याला हात जोडल्या शिवाय खायला येत नाही त्याची हात जोडून विनंती करावी लागते तर लगेच येतो नाहीतर ढुंकून पण बघत नाही..मच्छी असली तरी येत नाही
हात जोडले तर भाजी खायला पण लगेच येतो..( यावर तुमचा विश्वास बसणार नाही हे मला माहीत आहे .)

खूप वेळा पिंड दान केल्यावर कावळा येत नाही ..जरी आला तरी चोच मारत नाही मग लोक सर्व इच्छापूर्ती संबंधी बोलून दाखवतात...तरीही तो चोच लावत नाही...मग दर्भाचा कावळा करून पिंडाला स्पर्श केला जातो ..यावर एक उपाय सांगतो..पटला तर बघा नाहीतर सोडुन द्या .खूप वेळेला असे होते की जो आत्मा आहे त्याच्या इच्छा फारसा नसतात पण त्याला चांगली गती हवी असते म्हणून त्याला पुण्य अंश ची गरज असते..मग अशा वेळी घरातील कोणी त्याला वचन द्यावे की अमुक दिवस शिव जप / शिवलीला अमृत / वगैरे जप करेन तुमच्या नावाने संकल्प धरून व त्याचे पुण्य तुम्हाला प्रदान करेन...किंवा काही अनाथ आश्रम..अंध शाळा...यांना देणगी देईन..गरीब विद्यार्थी ची फी भरेन..असे काही संकल्प करावेत..याने पिंडाला कावळा शिवतो...मग तसे झाल्यावर वचन दिल्याप्रमाणे विधी करावेत..हा एक पर्यायी उपाय आहे..मी काही लोकांना सुचवला होता..मी मुद्दाम फीडबॅक पण घेतला.सकारात्मक आला ..म्हणून.मी.ही पोस्ट टाकत आहे..यावर वाद होतील ते मला माहित आहे..पण आपल्या मुळे लोकांचे भले होत असेल तर काय वाईट आहे असा विचार माझ्या मनात आला..बाकी लोक दहीभात कावळ्याला दाखवत असतात त्याने कावळा लगेच येतो..असे ही असते .त्याला दहीभात आवडत असावा .किंवा ही मग लालुच झाली .त्या पेक्षा वरील मी दिलेला उपाय केला तर समाजातील अन्य घटकांचे ही भले होईल..बाकी अन्य कथा नुसार कावळा हा शनी महाराज वाहन म्हटले जाते..अन्य कथे नुसार एकदा त्रेता युगात एक यज्ञ चालू होता तेव्हा सर्व देव आहुती घेण्यासाठी यज्ञ मंडपात आले होते.त्याच वेळी रावण त्या मंडपात घुसला..ते बघून सर्व देवांनी त्या वेळी प्रचलित असलेल्या प्राणी पक्षाची रूपे धारण केली .नंतर रावण गेल्यावर सर्व देव मूळ रूपात आले .मात्र त्यावेळी देवांनी सर्व पक्षांना आपल्यातील एक गुण प्रदान केला .इंद्राने मयूर रूप घेतले म्हणून इंद्र सहस्त्र अक्ष म्हणून मोर पिस वर डोळे.. वगैरे.. यमाने कावळा स्वरूप घेतले होते म्हणून यमाने कावळ्याला वरदान दिला की तू खाल्लेले पितृ देवांना पोचेल.....ॐ सूर्यपुत्राय विद्महे,महाकालाय धीमहि।तन्नो यम: प्रचोदयात्।।......

पितर साठी दान करताना संकल्प मंत्र देत आहे तो पठण करून दान द्यावे..म्हणजे ते अधिक शास्त्र शुद्घ होऊन जाईल.

 विष्णुर्विष्णुर्विष्णु नम: परमात्मने पुरुषोत्तमाय ॐ तत्सत् अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्री श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कल‍ि प्रथम चरणे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरत खण्डे... क्षेत्रे... पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे/ दक्षिणायने,---- ऋतौ, --- मासे, ---पक्षे, ---तिथौ (तिथि),---वासरे (जो वार असेल तो ) ---गौत्र: ....गौतम..विश्वामित्र..जे काय असेल ते..अहं। शास्त्रोक्त फल प्राप्ति द्वारा मम समस्त पितृ शान्त्यर्थे श्री परमेश्वर प्रीत्यर्थं... दान (या गौ/ भूमि इत्यादि जे काय तुमचे दान असेल ते..) निष्क्रय द्रव्यं चाहं करिष्ये।' ॐ तत्सत्।

इथे गोत्र हे महत्त्वाचे असते..भारतीय संस्कृती मध्ये गोत्र हे अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेले आहे .. गोत्र ही कल्पना पश्चिमी देशात टोळी वरून केली जाते तसे भारतात अजिबात नाही हे इथे मी मुद्दाम सांगतो...

भारतात  गोत्र हे प्राचीन ऋषी मुनी पासून तयार झाले आहे..मूळ ऋषी समजा गौतम आहे तर त्याच्या पासून निर्माण झालेली पिढी..मग त्यात मोठी पाती धाकटी पाती असे प्रकार निर्माण झाले..मग समजा धाकटी पाती हीचा मुख्य ऋषी शांडिल्य असेल तर त्याचे शांडिल्य गोत्र असे हे काही लोक मानू लागले..मोठी पाती समजा अन्य कोणी ऋषी तर मग त्याचे वंशज हे त्या ऋषिला मूळ गोत्र मानू लागले.
काही लोकांस आपले गोत्र माहीत नसते तर त्यांनी सरळ कश्यप गोत्र उच्चारण करावे..कारण कश्यप ऋषी हे मूळ पुरुष मानले जातात . त्यांच्या इतर संतती पासून इतर गोत्र उत्पन्न झाली..

दक्ष कन्या मधल्या १३ कन्या सोबत कश्यप ऋषी यांचा विवाह झाला..त्यांची नावे..
अदिति, दिति, दनु, काष्ठा, अरिष्टा, सुरसा, इला, मुनि, क्रोधवशा, ताम्रा, सुरभि, सुरसा, तिमि, विनता, कद्रू, पतांगी और यामिनी ..त्यापासून पुढची प्रजा निर्माण झाली...

बौधायन सूत्रानुसार विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात..म्हणजे या आठ ऋषींची नावे ही काही वेळा गोत्र संस्थापक म्हणून घेतली जातात..

धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दिले आहे,

‘तत्र गोत्र लक्षणम् – विश्वामित्रो जमदग्निर भारद्वाजोsथ गौतमः | अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ||’

अर्थात, विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय. गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हणतात.

गोत्रांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ(पहिल्या तीनमध्ये नसलेले). या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसू व इंद्रप्रमाद; पराशर गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्त्य व पाराशर्य; कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रात्रवरुण व कौंडिण्य ही होत..

गोत्रांची संख्या अगणीत असली तरी आपल्यासाठी त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तिन ते पाच पर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात. काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो. 

पूर्वी आडनावे नव्हती त्यावेळी हे गोत्र आणि प्रवर वरून व्यक्तीची ओळख पटवली जात असे..म्हणजे अगस्त्य कुळ उत्पन्न  प्रवर अमुक अशी ओळख पटवली जात असे...त्यावरून इतर ओळखी निघत असत..ही गोत्र उच्चारण वैदिक संस्कृती मध्ये १६ संस्कार मध्ये घेतली जात असत..त्यामुळे सर्वांना आपापली गोत्र प्रवर बिनचूक पाठ असतं . 

हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत :

गर्भाधान......पुंसवन ....अनवलोभन......सीमंतोन्नयन...
जातकर्म.......नामकरण......सूर्यावलोकन.....निष्क्रम.......अन्नप्राशन......वर्धापन.....चूडाकर्म.....अक्षरारंभ.......उपनयन....समावर्तन.....विवाह. ..अंत्येष्टी
यातील प्रत्येक विधी सुरू करताना गोत्र प्रवर उच्चारण केले जात असे...काळाच्या ओघात यातील ३/४ संस्कार आता शेष राहिले आहेत. 

हा विषय भरपूर किचकट आहे त्यामुळे छोट्या पोस्ट मध्ये याचे विवरण केले जाऊ शकत नाही.. आज इथे एवढी माहिती पुरे झाली..

आदेश.  

सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत..नावाशिवाय लेख फिरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.  

लेखक संजय सोपारकर

Thursday, 14 September 2023

संजय सोपारकर ( पारायण व अडथले )

मला बऱ्याच लोकांनी विचारले आहे की घरात आम्ही काही ही पारायण किंवा अनुष्ठान करायला घेतले की घरात लगेच क्लेश सुरू होतात...घरचे वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित होऊ लागते. घरातील लोक उगाच एक मेकांशी वाद घालू लागतात त्यामुळे वातावरण गरम होऊन लागते..छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होउ लागतात..त्यामुळे होते काय जी व्यक्ती हे अनुष्ठान करते त्याचे ही लक्ष अनुष्ठान किंवा पारायणात लागत नाही.. काही  वेळा साधकाचीही मोठ्या प्रमाणात चिडचिड होऊ लागते आणि साधक छोट्या गोष्टी वरून गरम होऊन घरातील इतर व्यक्तीच्या अंगावर धावून जाऊ लागतो...किंवा घरचे लोक साधकाच्या अंगावर धावून जातात...यासाठी अनेक लोकांनी विचारले आहे की आमचे काय चुकते आहे काय ? अध्यात्मिक कार्य घरात चालू केल्यावर घरात क्लेश कमी होण्या ऐवजी उलट वाढले आहेत..
याचे कारण सांगतो.. हे कलियुग आहे त्यामुळे काळ  प्रवाह वर कली  प्रभाव आहे. कली प्रभाव म्हणजेच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव..जो वातावरणात भरून राहिला आहे..म्हणूनच धार्मिक गोष्टी करायला घेतल्या की घरातील लोकांची पण डोके फिरून जाते .अध्यात्मिक गोष्टी करायला घेतल्या की घरातील नकारात्मक तरंग ( हल्ली हे  नकारात्मक तरंग वातावरणात सर्वत्र पसरले असतात ) मध्ये खळबळ उडून ते तरंग माणसाच्या मनात खळबळ माजवून देतात त्यामुळे घरातील सभासदांची मन बिथरून जाऊन तंटे होतात..

यावर उपाय सांगतो..घरातील लोकांनी इतर सदस्यांनी नाम स्मरण वर जास्त भर द्यावा..इतर सदस्य तसे करत नसतील तर निदान अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीने नामस्मरण वर भर द्यावा.. तसेच घरात सकाळ संध्याकाळ रुईची सुकलेली पाने घालून धूप दाखवावा..दुसरे असे जो पर्यंत अनुष्ठान किंवा पारायण चालू आहे तो पर्यंत घरी मांसाहार शिजवू नये..आता काही लोकांची तक्रार आम्ही सांगून पण घरातील लोक ऐकत नाहीत..तर त्याला आता इलाज नाही .व्यक्ती तितक्या प्रकृती. यावर उपाय एकच साधकाने घरी  मौन पालन करावे. कुणाच्याही उठाठेवित पडू नये..स्वतःचे मन प्रसन्न ठेवावे..तसेच अनुष्ठान काळात उपवास टाळावे..कारण शरीर मजबूत राहिले तरच तुम्ही अनुष्ठान करू शकाल. पूर्वीच्या काळी उपवास करत असत कारण तेव्हा माणसाला अनुष्ठान काळात पूर्ण वेळ घरी बसणे शक्य होते. आता तसे शक्य नाही. म्हणून उपवास करणे आवश्यक नाही..उपवास याचा खरा अर्थ उप+ वास म्हणजे ईश्वरा जवळ मनाने वास करणे असा आहे. तो विसरून आपण हल्ली साबुदाणा खिचडी..साबुदाणा वडा.. रताळी भाजी खाण्यात धन्यता मानतो. 
अनुष्ठान काळात फळे जास्त खावीत.. त्याने शरीरातील विष द्रव्य कमी होण्यात मदत होते तसेच मन ही शांत राहते..तसेच साधकाच्या शरीरात अनुष्ठान प्रभाव मुळे उष्णता वाढते ज्यामुळे साधक एकदम गरम होतो तो उष्णता पण फलाहार मुळे नियंत्रित राहील..पूर्वीचे ऋषी यासाठीच फलाहार वर जोर देत असत...तेव्हा साधकाने या काळात फलाहार वर जास्त भर द्यावा आणि मुख्य म्हणजे घरातील कोणत्याही भानगडीत जास्त लक्ष घालू नये. 
तसेच एक बिब्बा + एक हिरवे लिंबू + एक सुपारी  + ५ छोटे खिळे + ५ अख्ख्या म्हणजे वर फुल असलेल्या लवंग हे सर्व एका चौरस सफेद  कपड्यात  बांधून घरात बांधून ठेवावा..अनुष्ठान चे पहिल्या दिवशी हे गाठोडे अची अनुष्ठान चे जागी अर्धा तास ठेवून विघ्न दूर करण्याबद्दल प्रार्थना करावी..मग हे गाठोडे घरात कोठेही भिंतीवर खिळा ठोकून त्यावर लटकवून ठेवा..अनुष्ठान पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी बाहेर कचऱ्यात टाकावा. बिब्बा या फळावर कलीचे अधिष्ठान आहे असे मानले जाते..त्यामुळे नकारात्मक तरंग या वस्तू कडे आकर्षित होऊन तिथेच चिकटून राहतात.  हा उपाय फक्त अनुष्ठान काळातच करावा..

मी दिलेले नियम पाळून अनुष्ठान केल्यास ते सफल होण्यास मदत होईल..

लेखनाचे सर्व हक्क सुरक्षित आहेत...नावाशिवाय हा लेख फिरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल..

आदेश. 

लेखक संजय सोपारकर